Monday, October 29, 2007

पुणेकरांची श्रद्धास्थाने

मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती
पुण्याची ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला पहिला मान देण्यात आला आहे. पुण्यात कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासूनच सार्वजनिक गणेशात्सवाला सुरूवात होते.

 

मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी

मानाचा तिसरा गणपती : गुरुजी तालीम

भाऊ रंगारी यांचा गणपती

 

वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या गणपतीला खऱ्या अर्थाने पहिला सार्वजनिक गणपती म्हणावे लागेल . कृष्णाजीपंत खासगीवाले यांनी ग्वाल्हेर भेटीत तेथील सार्वजनिक गणेशोत्सव पाहिला . त्याने प्रेरित झालेल्या खासगीवाले यांना पुण्यातही असा उत्सव सुरू व्हावा , असे वाटले . त्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली . शालूकर बोळात रंगारी यांच्या निवासस्थानी या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पहिली मुहुर्तमेढ रोवली गेली . स्वातंत्र्याच्या चळवळीस वेग येण्यासाठी , तसेच प्रबोधनाचे व्यासपीठ म्हणून १८९२ मध्ये भाऊ रंगारी यांच्या गणपतीपासून सात दिवसांचा गणेशोत्सव सुरू केला . १९९३ पासून तो दहा दिवसांचा झाला .

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

याला कोतवाल चावडी गणपती किंवा बाहुलीचा हौद गणपती असे नाव होते . श्रीमंत दगडुशेठ हलवाई यांनी १८९३मध्ये स्वखर्चाने ही मूतीर् बसविली होती . तेव्हापासूनच नवसाला पावणारा देव अशी या गणरायाची ख्याती आहे . १९६७ मध्ये नवी मूतीर् बसवण्यात आली . कर्नाटकातील मूतिर्कार शंकरअप्पा आणि त्यांचे चिरंजीव नागेश शिल्पी यांनी ती तयार केली होती . या मूतीर्ला यंदा ४० वषेर् पूर्ण होत आहेत . दगडुशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणे आणि राज्यातूनच नव्हे ; तर संपूर्ण देशातून भाविक येतात . या ट्रस्टचा वाषिर्क जमाखार्च सहा कोटी रुपयांच्या घरात जातो .

 

अखिल मंडई मंडळ गणपती

मंडई हे पुण्याचे मध्यवतीर् ठिकाण . हा गणपती म्हणजे मंडईत येणाऱ्या अठरापगड जातींच्या पुणेकरांच्या एकीचे प्रतीक मानले जाते . या मंडईतील गणपतीची स्थापनाही १८९३ सालीच झाली . लोकमान्य टिळकांची या मंडळासमोर गणेशोत्सवात अनेकदा व्याख्याने झाली . श्री शारदा आणि गजाननाची मूतीर् असलेला हा गणपती मानाच्या पाच गणपतींमध्ये नसला तरी सामान्य पुणेकरांच्या दृष्टीने त्याला महत्त्वाचे स्थान आहे .

 

विंचुरकर वाडा गणपती

लोकमान्य टिळकांनी ' केसरी ' संस्थेचा गणपती ते राहात असलेल्या विंचुरकर वाड्यात सुरू केला . कायदा विषयावर क्लासेस घेणाऱ्या टिळकांच्या या गणपतीला तेव्हा ' लॉ क्लासचा गणपती ' असेच नाव पडले होते . वाड्यातील पटांगणात मंडप टाकून त्यात हा उत्सव साजरा होऊ लागला .

ठाण्यात यंदाही इको फ्रेंडली विसर्जनाला प्राधान्य

ठाणे, ता. १४ - शहरातील तलावांमधील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या "इको फ्रेंडली गणेशमूर्ती विसर्जन' संकल्पनेला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे यंदाही पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. .....
तसेच गणेशोत्सवापूर्वी महत्त्वाच्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी दिले.

महापालिकेच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी वागळे इस्टेट येथील रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, मासुंदा तलाव येथे कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मुंबईतील घाटकोपर, भांडुप, मुलुंड येथील मोठ्या उंचीच्या गणेशमूर्ती लहान तलावात बुडविताना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन या मूर्तींना रेतीबंदर येथील घाटावर विसर्जनासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत रेतीबंदर येथे विसर्जनासाठी महाघाट तयार करण्यात आले आहेत. भरती आणि ओहोटीच्या वेळा लक्षात घेऊन हे घाट बांधण्यात आले आहेत. येथे वाहनतळ, अग्निशमन दल, पाणबुडी पथक, प्रखर विद्युत व्यवस्था आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

मुख्य अथवा कृत्रिम तलावात मोठ्या संख्येने गर्दी होऊ नये यासाठी यंदाही महापालिकेतर्फे गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे उभारली जाणार आहेत. या केंद्रांत स्वीकारलेल्या मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाणार आहे. महापालिका कार्यालय पाचपाखाडी, राम मारुती रोड येथील मडवी हाऊस, वर्तकनगरमधील व्यंकटेश मंदिर, चिरंजीवी हॉस्पिटल, पोखरण रोड क्रमांक २ येथील वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक १६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर आदी ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वीकारल्या जाणार आहेत.

रूप गणेशाचे

।। रूप ॐकार साकाराचे ।।

तू तो ॐकार साकार अखिल विश्वाचा आधार।
मूलतत्त्व निराकार तो ही तूचिं गणेशा ।।

श्री गणरायाचं हे सार्थ वर्णन.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि , असा ज्याचा उल्लेख केला गेलाय , म्हणजेच ज्यानं अवघं विश्व व्यापून टाकलंय असा हा श्रीगणेश.. पण तरीही हा गणपतीबाप्पा आपल्याला आपल्यातलाच एक वाटतो.. त्याचं साजिरं रूप तर आपल्याला भलतंच भावतं.. वक्रतुंड , महाकाय , शूर्पकर्ण , गजानन , एकदंत , लंबोदर , अशी अनेक नावं या गणेशानं धारण केली आहेत. पण त्याचं हे रूप प्रतिकात्मक आहे , ती आहे प्रतिकांची देवता.. नेता आणि तत्त्ववेत्त्याचे गुण तो आपल्या रुपातून सांगतो , ते असेः
श्री गणपतीचं शीर हत्तीचं कसं , याबद्दलची पौराणिक कथा आपण सारेच जाणतो. अजाणतेपणी गणपतीचं शीर भगवान शंकराने कापून टाकले आणि नंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी त्यांनी पार्षदाला शीर शोधून आणण्यास पाठविले. तेव्हा तो हत्तीचं मस्तक घेऊन आला आणि ते गणेशाच्या धडावर ठेवण्यात आले आणि गणपती झाला गजानन. ही कथा भावगर्भित आहे. भगवान शंकर जर आपल्या मुलाला हत्तीचे मस्तक बसवू शकतो तर गणेशाचे स्वतःचेच मस्तक का नाही , हा प्रश्न स्वाभाविकच प्रत्येकाच्या मनात येतो. पण , पुराणकथा इतक्या साध्या नसतात. या कथेचा गर्भितार्थ असा की , गणपती ही तत्त्वज्ञानाची देवता आणि समाजाचा नेता आहे. तत्त्ववेत्ता आणि नेता यांच्याजवळ हत्तीचेच मस्तक असले पाहिजे. संकुचित वृत्तीचा माणूस महान तत्त्ववेत्ता किंवा लोकप्रिय नेता बनू शकत नाही.
गण-पती म्हणजेच समूहाचा पती , अर्थात नेता. तो गुण-पतीही आहे. नेता आणि तत्त्ववेत्त्याकडे बाह्य सौंदर्य नसले तरी आंतरिक सौंदर्याचे अमाप वैभव असले पाहिजे , हेही श्रीगणेशाच्या रुपातून प्रतीत होते. तसेच , हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये हुशार मानला जातो आणि नेता निर्बुद्ध असून कसे चालेल , म्हणून गणपती गजानन.
या गजाननाचे कान सुपासारखे कशासाठी , तर नेत्याने सर्वांचे बोलणे ऐकून घ्यावे. पण त्यातले सार ग्रहण करून तत्त्व नसलेल्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात , हे मार्गदर्शन त्यात आहे. हे मोठे कान उत्तम श्रवणभक्तीचेही दिग्दर्शन आहे
गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे , आयुष्यात सूक्ष्म-दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात , तसेच ते दूरदृष्टीदेखील सुचवितात. हत्ती व्यक्तीचे भविष्य वाचू शकतो , असेही आपल्याकडे मानले जाते. म्हणूनच , जुन्या काळात कुण्या बेवारस राजाचे निधन झाले तर हत्तीणीच्या सोंडेत माळ देत व ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राजा बनवत असत. हत्तीचे लांब नाक अर्थात सोंडही त्याचेच प्रतीक आहे. भविष्यात घडणा-या गोष्टींचा गंध नेत्याला प्रथम आला पाहिजे , असे ही सोंड सुचवते.
श्री गणेशाचे दोन सुळे.. एक पूर्ण आणि दुसरा अर्धा. त्यातला पूर्ण सुळा श्रद्धेचा आणि अर्धा बुद्धीचा आहे. त्याचा अर्थ असा की , जीवन विकासासाठी स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. भले विद्वत्ता काहीशी कमी असेल तरी चालेल !
गणपतीच्या चार हातांपैकी एका हातात अंकुश , दुस-या हातात पाश , तिस-या हातात मोदक आहे आणि चौथ्या हाताने तो आशीर्वाद देतोय. त्यापैकी अंकुश वासना-विकारांवर संयमाची गरज असल्याचे सुचवितो , तर गरज पडताच इंद्रीयांना किंवा अनुयायांना शिक्षा करण्याचे सामर्थ्यही तत्त्ववेत्ता आणि नेत्यामध्ये असायला हवे , असे पाश सुचित करतो. मोदकाचेही दोन-तीन अर्थ आहेत. ज्याच्यामुळे आनंद होतो असा सात्विक आहार महापुरुषांचा असावा. म्हणजेच इंद्रियांचा आहार सात्त्विक असला पाहिजे. शिवाय मोदक हे तत्त्वज्ञानाचेही प्रतीक आहे. मोदकाच्या पापुद्र्याप्रमाणे तत्त्वज्ञानही वरवर चाखणा-यांना फिकेच वाटते. परंतु आतील सारभाग मधुर असतो. आणि जे कर्माचा फळरुपी मोदक देवाच्या हातात ठेवतात त्यांना तो आशीर्वाद देतो.

गणपतीबाप्पाला लंबोदर म्हणतात. कारण , सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरात साठवून ठेवण्याची सूचना तो करतो. गणरायाचे पाय लहान आहेत. त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. यातून तो असे सुचवितो की , कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये. तसेच तोकडे पाय हे बुद्घिवंताचेही मानले जाते.
सुखकर्त्या आणि विघ्नहर्त्या गणेशाचे वाहन उंदीर आहे. गरूड , नंदी या विशाल वाहनांऐवजी गणपतीने उंदराला आपले वाहन केले कारण , तो सर्व भक्तांच्या घरात प्रवेश करू इच्छितो. हा उदार दृष्टिकोन प्रत्येक नेत्याने ठेवायला हवा. तसेच उंदीर हे मायेचेही प्रतीक आहे. आणि या मायेवर फक्त ज्ञानी माणूसच अंकुश ठेवू शकतो , तिच्यावर स्वार होऊ शकतो.
गणपतीला वक्रतुण्ड म्हणतात. म्हणजे ऋद्धिसिद्धिपासून मुख फिरवून राहणा-यालाच ऋद्धिसिद्धि मिळतात. वाकडे-तिकडे चालणा-याला , आडव्या रस्त्याला जाणा-याला जो दंड देतो तो वक्रतुण्ड.
नेता आणि तत्त्ववेत्ता कसा असावा , हे गणपती आपल्या आवडीनिवडीतूनही दाखवितो. त्याला दुर्वा खूप आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही , असे गवत त्याने स्वतःचे मानले आणि त्याचे महत्त्व वाढविले. नेत्याने आणि तत्त्ववेत्त्यानेही अशाच दुर्लक्षितांना आपले मानले पाहिजे. गणपतीला लाल फुल आवडते. कारण लाल रंग क्रांतीचा आहे. नेता आणि तत्त्ववेत्त्यालाही क्रांती प्रिय असायला हवी , असे त्यामागचे तत्त्वज्ञान आहे.
म्हणूनच या गणरायाचं वर्णन ॐकार असं केलं जातं.
अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ।।

- संस्कृति पूजन या संग्रहातून साभार

पुढल्या वर्षी बाप्पा लवकर येणार

यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी १५ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागली होती. पुढील वर्षी मात्र सर्वांचा आवडता गणराय बारा दिवस अगोदर म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी भक्तांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
तसेच २००९ मध्ये ऑगस्ट महिन्यातच गणेशाचे आगमन होणार आहे.

२००८ मध्ये ३ सप्टेंबर रोजी; तर २००९ मध्ये २३ ऑगस्ट रोजी, २०१० मध्ये ११ सप्टेंबर, २०११ मध्ये १ सप्टेंबर, २०१२ मध्ये १९ सप्टेंबर आणि २०१३ मध्ये ९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. २०१२ मध्ये उशिरा म्हणजेच १९ सप्टेंबरपर्यंत गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अंबेजोगाई योगेश्वरी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांशिवाय इतर काही प्रसिद्ध अशी आदिमायेची शक्तीस्थानं आहेत. त्यापैकी 'अंबेजोगाई' या ठिकाणाचे अंबेजोगाई योगेश्वरीचे मंदिर होय. बीड जिल्ह्यात हे क्षेत्र वसले आहे. परभणी किंवा नांदेडला उतरून एस.. टी., सुमो आदि वाहनांनी तुम्ही 'अंबेजोगाई' या तालुक्यात पोचू शकता.

अंबेजोगाई येथील देवीचे नाव आहे योगेश्वरी. या देवीच्या स्थानासंदर्भात काही आख्यायिका आहेत. देतासूर नामक दैत्याचा वध करण्यासाठी देवीने घेतलेला अवतार म्हणजे योगेश्वरीचा अवतार असे कोणी म्हणतात. योगेश्वरी हा पार्वतीचाच अवतार समजला जातो! अंबेजोगाई' येथील ग्रामस्थांची ही ग्रामदेवता आहे.

ही देवी कुमारिका आहे व देवीचा अवतार कुमारिकेचा का, याची देखील आख्यायिका सांगितली जाते. पार्वतीने 'त्रिपुरसुंदरी' नामक अवतार घेतला व तिचा परळी येथील वैजनाथ (बैद्यनाथ) यांच्याशी विवाह निश्चित झाला होता. पण त्रिपुरसुंदरीला कुमारिकाच रहायचे होते. लग्नाच्या निमित्ताने त्रिपुरसुंदरी आणि सर्व वऱ्हाड 'परळी' गावाजवळ असणाऱ्या 'अंबेजोगाई' येथील शिवलेण्यात वास्तव्याला आले. विवाहमुहूर्ताच्या वेळी 'त्रिपुरसुंदरी' आपल्या जागेवरच बसून राहिली. तिने ठामपणे विवाहास नकार दिला. लग्नाच्या कारणाने कोकणातील मूळ देवता 'अंबेजोगाई' येथे आली व तेथेच राहिली, असेही या संदर्भात सांगितले जाते.

खरं तर मार्गशीर्ष शुद्ध पौणिर्मा हा देवीचा जन्मदिवस. त्यामुळे अंबेजोगाई येथील मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौणिर्मा असा नवरात्रौत्सव साजरा करतात. पण योगेश्वरी हा देवीचा अवतार म्हणजेच देवीचे रूप असल्याने शारदीय नवरात्रही येथे थाटामाटात साजरे करतात.

देवीच्या हातात शस्त्रायुद्धांबरोबरच परडीही आहे. शारदीय नवरात्रात काकड आरती, दुपारचा नैवैद्य आणि मुख्य म्हणजे देवीला प्रसाद म्हणून तांबूल (विडा) देण्याची पद्धतही येथे आहे. शारदीय नवरात्रात अष्टमीला शतचंडी हवन करण्याची प्रथा असून, नवमीला पूर्णाहूती असते. दसऱ्याला 'अंबेजोगाई' मंदिरातील जी मूतीर् 'उत्सवमूतीर्' म्हणून असते, तिची पालखीतून गावभर मिरवणूक काढली जाते. यावेळी गोंधळी व आराधी बायका यांची उपस्थिती असते. जोगवा मागितला जातो. रात्री मिरवणूक पुन्हा देवळात परतल्यावर प्रसादाचे वाटप होते. मार्गशीर्षातील नवरात्रोत्सवातही पौणिर्मेला अशी उत्सवमूतीर्ची पालखीतून मिरवणूक काढली जाते. कारण तो देवीचा जन्मोत्सव असतो. त्या उत्सवातही शतचंडी हवन केले जाते.

योगेश्वरीची मूतीर् शेंदरी रंगाची असून तिचे रूप उग्र आहे. अष्टमी आणि दसऱ्याला देवीला सर्व दागिन्यांनी सुशोभित केले जातं. नवरात्रात रोज साधारणपणे दहा हजार लोक देवीच्या दर्शनाला येतात. अंबेजोगाई येथे काही हॉटेल्स आहेत. त्यापैकी 'कृष्णाई' हॉटेल मुक्काम व जेवणखाणासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे वाड्यामध्ये जे गुरुजी वास्तव्य करतात, त्यांच्याशी संपर्क साधता अभिषेक- पूजा याची सोय होऊ शकते. मात्र गाभाऱ्यात बसून पूजा करताना पुरुषाने सोवळे (कद) नेसणे अनिवार्य असते.

' थोरली जाऊ' चित्रपटातील 'आदिमाया अंबाबाई' हे सुधीर मोघे यांचं गीत कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई अशा तीर्थक्षेत्री चित्रीत झालंय. त्यात अंबेजोगाईचं वर्णन करताना म्हटलंय.

'' अमरावतीची देवता शाश्वत अमर

अंबेजोगाईत तिने मांडीयले घर

मुंबापुरीच्या गदीर्ला दान चैतन्याचे देई'' खरोखरच मुंबईकरांना आणि कोकणवासियांना कोकणस्थांची कुलदेवता असणारी अंबेजोगाई चैतन्याची प्रेरणा देते.

- गणेश आचवल